Prarambh Tours

Prarambh Tours Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prarambh Tours, Mumbai.

02/06/2017

*चलो कर्नाळा* कर्नाळ्याचा डोंगर चढायला, व यथेच्छ पावसात भिजायला...

*प्रारंभ प्रतिष्ठान, मुंबई* आपल्यासाठी घेऊन येत आहे *सहल कर्नाळ्याची*

*रविवार दि. १८ जून २०१७*

निघण्याचे ठिकाण- *दादर (पूर्व)*

निघण्याची दिनांक व वेळ- *रविवार दि.१८ जून २०१७ पहाटे ५:३० वाजता दादरहून*

मुंबईत परत पोहोचण्याची अंदाजित वेळ- *रविवार दि. १८ जून २०१७ सायं ८.०० वा.*

*पिक अप पॉईंट* - दादर, सायन, चेंबूर नाका, मैत्रीपार्क, बीएआरसी, वाशी, जुईनगर, नेरूळ (एल.पी.),खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेल

*नोंदणी शुल्क: रू. ९००/-*(समवेत *चहा-नाष्टा, दुपारचे जेवण, कर्नाळा अभयारण्य प्रवेश शुल्क, व खाजगी नॉन एसी बस प्रवास*)

नोंदणी करण्याची शेवटची दि. *८ जून २०१७.* (रू.६००/- (विनापरत) भरून आगाऊ नोंदणी आवश्यक).

*८ जून २०१७ पर्यंत येणाऱ्या नोंदणीस प्राधान्य..*

*सूचना: कार्यक्रमात कोणत्याही क्षणी परिस्थितीप्रमाणे बदल होऊ शकतात.*

*सूचना- किल्ला चढण्यास अंदाजे दीड तास लागतो*

*धुम्रपानास व मद्यपानास सक्त मनाई असेल.*

अधिक माहितीसाठी संपर्क:

*रोशन सावंत- 9870790112*
*अंकिता परब- 9004237563*
*सोनल राणे-7208130612*
*शीला डोर्लेकर-9820795762*

आपले विश्वासू,
*प्रारंभ प्रतिष्ठान*

मित्रांनो,चला पावसाची मजा लुटायला, निसर्ग जवळून अनुभवायला, धबधब्यामध्ये भिजायला, नदीत डुंबायला....प्रारंभ प्रतिष्ठान आपल...
31/07/2016

मित्रांनो,

चला पावसाची मजा लुटायला, निसर्ग जवळून अनुभवायला, धबधब्यामध्ये भिजायला, नदीत डुंबायला....

प्रारंभ प्रतिष्ठान आपल्यासाठी घेऊन येत आहे एकदिवसीय सहल

दिनांक : २८ ऑगस्ट २०१६
ठिकाण : सोंडेवाडी (ता-खालापूर)
प्रस्थान : रविवार दि. २८ ऑगस्ट सकाळी ५.३० वा. दादरहून (प्रितम हॉटेल) खाजगी बसने ( नॉन ए.सी.)
शुल्क : रू. ९००/- (प्रवास, चहा-नाष्टा, दुपारचे जेवण इ. समवेत)

मर्यादित जागा...त्वरा करा...

रु. ५००/- (विनापरत) भरून आगाऊ नोंदणी आवश्यक

नावनोंदणीसाठी शेवटची दि. १० ऑगस्ट २०१६

नावनोंदणी व अधिक माहितीकरीता संपर्क:

८०८२६९४९९३- सिद्धेश सावंत.

सूचना-धुम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई असेल.

12/03/2016

मंडळी नमस्कार,
आपण 2 एप्रिल रोजी मुंबई दादर येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत.............."जमिनीचा सात बारा" .........
या विषयावर 3 तासाचा कार्यक्रम घेत आहोत. हा विषय फार महत्वाचा आहे. पत्ता: रामभाऊ म्हाळगी हॉल, चंचल स्मृती बिल्डिंग, 1ला माळा, वडाळा उद्योग भवन जवळ, शारदा टॉकीजच्या पुढे, दादर पूर्व.
आपल्या कोकणात जमीन एकतर गुंठ्यात असते त्यात 3 ते 4 पिढया वाटप झालेले नसते त्यामुळे जर शेतीमध्ये काही करायचे म्हटले तर त्या सात बाऱ्यावर हि मोठी यादी असते. त्यात कुणी काय करायचे म्हटले तर सातबाराच्या अडचणी समोर येतात. जमीनिचा विकास करायचा म्हटले कि प्रथम तिचा सातबारा क्लिअर असणे जरुरी आहे. त्यामुळे सातबारा हा विषय समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आपण जर आपली जमीन कसत नसू तर ती सुरक्षितपणे भाडेतत्वावर देता येते...आपण सामुदायिक शेतीचा मार्ग अवलंबू शकतो.
तसेच या कार्यक्रमात हे पण जाणून घ्याल कि आपली जमीन आपण कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकतो तसेच सातबारा आपल्या नावे असण्याचे इतरही अनेक फायदे आहेत, जसे सरकारी योजना, कर्ज, सवलती...
त्यामुळे हा कार्यक्रम ज्यांची गावी जमीन आहे त्यांनी अजिबात विसरू नका. सर्वाना हि महत्वाची माहिती मिळावी म्हणून हा कार्यक्रम मोफत ठेवलाय... आजच आपलं नाव रजिस्टर करून ठेवा जेणेकरून जागा फुल झाल्या तर प्रवेश नाही मिळायचा...त्यासाठी खालील नंबरवर बस एक sms अथवा whatsup करा कि मी येत आहे आणि....माझं नाव आहे. Thats it...किंवा कॉल करून नाव नोंदवा.9869154854/9967410081...

अजय यादवराव
अध्यक्ष - समरसेट फाऊंडेशन

08/01/2016

" कोकण अनुभवूया, सेल्फी काढूया " , कोकण प्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोकण अनुभवण्याची संधी दिनांक १४ ते १८ जानेवारी २०१६ रोजी काळाचौकी - लालबाग इथे . प्रवेश विनामुल्य
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 9930365566 / 9029996949
आयोजक : सुशांत लांबे , वैभव लांबे, सचिन पिळणकर
internationalkokanfestival.com

31/12/2015

.....2015....
साल ज़रूर बदल रहा है

लेकिन साथ नहीं .....

स्नेह सदैव बना रहे 🙏🙏🙏

🎤🍹🌠🎈🎊 2016

सावंतवाडीचा उभा बाजार....        सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी शहरात सरळसोट चढणीवर लाकडी खेळण्यांचा बाजार वसलेला पाह...
24/11/2015

सावंतवाडीचा उभा बाजार....

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी शहरात सरळसोट चढणीवर लाकडी खेळण्यांचा बाजार वसलेला पाहायला मिळतो. सर्व प्रकारची लाकडी फळे, लाकडापासून बनविलेल्या कौशल्यपूर्ण वस्तू मिळण्याचे हे एकमेव ठिकाण. तेथून थोडे पुढे आले की चितार आळीत, लाकडी व स्टोन प्रकारातले नानाविध अँटिक्स मन आकर्षित करतात. श्री.अमित चितारी यांनी जे.जे.आर्टस् मधून डीग्री मिळवून फाईन आर्टसचा वापर करुन, हस्तकौशल्याने तयार केलेले अँटिक्स पाहून, सर्वच वस्तू घेण्याचा मोह होत होता. कोकणातल्या या युवकाने मारलेली ही उद्योगभरारी, फाईन आर्टसचा केलेला व्यावसायिक वापर पाहून त्यांच्या कलेला लोकांपर्यंत पोचवून, प्रारंभच्या शुभचिंतकांना या वस्तू घरबसल्या स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याचे आम्ही ठरवले. श्री.अमित चितारी आणि प्रारंभच्या संयुक्त प्रयत्नाने या वस्तू आपण आपल्या मागणीनुसार बनवून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.
८०८२६९४९९३

20/11/2015

चकदेवची जत्रा....
खेड येथील रघुवीर घाट येथून साधरण ४० km वर चकदेव ह्या गावाचे अस्तित्व आहे. रत्नागिरी व सातारा ह्याच्या सीमेवर (डोंगरावर) हे गाव आहे. एका बाजूला रत्नागिरी तर दुसरया बाजूला सातारा जिल्हा आहे. तरीही हे गाव सातारा जिल्ह्यात मोडतं. निसर्ग रम्य परिसरात ह्या गावाचा वास आहे.
चकदेव हे एक खेडेगाव आहे. येथे २० घरांचा समूह आहे.
गावाच्या आवारात पूर्वकालीन (शिवकालीन) मंदिर आहे. ह्या मंदिराचे नाव "श्री शैल्य चौकेश्वर मंदिर" असे आहे. येथील देवाचे नाव "चौकेश्वर" आहे. हे मंदिर २००० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराचे पूर्ण दगडी बांधकाम आहे. वनवासादरम्यान श्री. राम यांनी एक रात्र ह्या मंदिरात वास्तव्य केले होते.
मंदिरात सात मुर्ती आहेत. राम लक्ष्मन भारत राम्वार्दयीनी
येथे एक स्वयंभू चौकेश्वर देवाची पिंड आहे.
मंदिराचे मागील बाजूस गावकऱ्यांच्या सहकार्याने मरी आईचे मंदिर बांधलेले आहे

या गावाची खासीयत म्हणजे :-
रामकाटा चे शीत पाणी
दिपमाळ
शिड्या
धनगरवाडा
राजगिर्याची भाजी

गावातील सण :
शिमगा
गणपती
एकादशी यात्रा

येत्या 23 तारखेला म्हणजे सोमवारी चकदेवची मोठी जत्रा आहे...येताय जत्रेला.?
ही जत्रा दरवर्षी दिवाळी मध्ये असते.....संपता संपता...

  Raigadh ...
16/11/2015

Raigadh ...

सागरेश्वर बीच - वेंगुर्ले....     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेला सागरेश्वर हा...
10/11/2015

सागरेश्वर बीच - वेंगुर्ले....

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेला सागरेश्वर हा स्वच्छ सुंदर सागर किनारा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनला आहे. पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित असलेल्या या किनाऱ्यावर महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे अद्ययावत तंबू निवासाची सोय करुन देण्यात आली आहे. रॉयलटेंट हाऊस या नावाने सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये दहा आरामदायी तंबू पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. वीज, पाणी, रस्ते इत्यादी सर्व सोयींनीयुक्त अशा या प्रकल्पामुळे समुद्रपर्यटनाकडे पर्यटकांचा ओढा दिसत आहे. निळाक्षार अथांग सागर आणि उजवीकडे दिसणारे वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य यामुळे या किनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

किनाऱ्याच्या बाजूलाच प्रसिध्द सागरेश्वराचे मंदिर आहे. लाकडी कोरीव कामाच्या सजावटीने बनविलेले, हे छोटेसे मंदिर फारच आकर्षक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवशंकर विराजमान झालेले आहेत. मंदिराच्या समोर दिपस्तंभ असून, बाजूला धर्मशाळा व एक विहीर आहे. अशा या मनमोहक ठिकाणाला जरुर भेट द्या.

10/11/2015

आपणा सर्वांना प्रारंभ परिवारातर्फे दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा....
येणारी पुढील वर्षे आपणांस सुख-समाधानाची, भरभराटीची आणि ऐतिहासिक भ्रमंतीत व निसर्गाच्या सान्निध्यात जावो....

प्रारंभ टूर्स आयोजित एकदिवसीय भटकंती मधील किल्ले कर्नाळा सफर...मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळ मुंबईपासून अंदाजे ६० किमी...
24/09/2015

प्रारंभ टूर्स आयोजित एकदिवसीय भटकंती मधील किल्ले कर्नाळा सफर...

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळ मुंबईपासून अंदाजे ६० किमी. अंतरावर कर्नाळा किल्ला त्याच्या अंगठ्यासारख्या आकारामुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळ्याखालचे पक्षी अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. किल्ल्यावर जाणारी वाट चांगली प्रशस्त आहे. साधारण अडीच तासात किल्ल्यावर पोहोचता येते.

मेजर जर्व्हीस याच्या मतानुसार कर्नाळा किल्ला देवगिरीचे यादव आणि नंतर निजामशहाकडे होता. या विधानाची शक्यता नाकारता येत नाही, कारण देवगिरीचे यादव यांच्या काळात चौल हे व्यापारी बंदर यादवांकडे होते. त्यामुळे साहजिकच त्या परिसरातील कर्नाळा किल्ल्यासारखी अनेक ठाणी त्यांच्याकडे असावीत.

इ.स.१५४० मध्ये गुजरातच्या सुलतानाकडून अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकून घेतला. पुन्हा पोर्तुगीजांच्या मदतीने गुजरात सैन्याने किल्ला काबीज केला. इ.स. १५४० मध्ये सांक्षी व कर्नाळा या दोन किल्ल्यांवर गुजरातच्या सुलतानाचे किल्लेदार होते. पुढे निजामाने हल्ला केल्यावर कर्नाळा पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून गुजरातचे सैन्य किल्ला सोडून निघून गेले. त्यानंतर पोर्तुगीजांनी किल्ला निजामाकडून विकत घेतला. कालांतराने परत किल्ला निजामशाहीत आला. शिवाजी महाराजांनी निजामशाहीचे कोकणातील किल्ले जिंकले तेव्हा कर्नाळा जिंकून घेतला. पण नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहात तो मुघलांना द्यावा लागला. परंतु नंतर महाराजांनी तो परत घेतला. गडावरील फारशी शिलालेखावरून असे दिसते की तो इ.स. १७३५ पर्यंत मुघलांकडे होता. इ.स.१७४० मध्ये पेशव्यांकडे आला. मे १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या संमतीने गड घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये ब्रिटीशांकडे गेला. इ.स. १८१८ पर्यंत वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके हेच गडाचे किल्लेदार होते.

Address

Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prarambh Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share